गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय तेहेतिसावा

ती आनंद भावे नमुनि । म्हणे काल भेटला मुनि । गुरु बोले मग हांसोनी । पालटोनी रुप मी आलो ॥

तुझें परप्रेम पाहिलें । रुद्राक्ष मींच दिल्हे । रुद्रतीर्थें वाचविलें । ऐक बालें नवल हें ॥२॥

अवश्यं हे ल्यावे सादर । पूर्वीं काश्मीरेशकुमार । प्रधानाचाही कुमार । अलंकार टाकून देती ॥३॥

त्या भ्रांत्या पिसे म्हणती । भस्मरुद्राक्षातें धरिती । पराशरा पुसे नृपति । हेतू वदति मुनी भूपा ॥४॥

सर्वात्म शिवा हे भजती । नंदिग्रामीं वेश्यासती । वैश्यरुपें गौरीपती । ये ती प्रती वळखावया ॥५॥

अनन्य स्त्रीत्र्यह होऊन । रतिदानें घे लिंग कंकण । तो बोले लिंगनाशन । होतां प्राण त्यजीन मी ॥६॥

त्याच्या वचना मानून । मंडपीं ठेवी लिंगरत्‍न । रमे वेश्या गृहीं नेऊन । जळे लिंगासह मंडप ॥७॥

वैश्य स्थिरवून मन । लिंग जळाले पाहून । करी अग्निप्रवेशन । सर्व दान देई वेश्या ॥८॥

निघे तंव लोक म्हणती । वेश्ये घरीं किती येती । कोणाची तूं कशी सती । नायकतां ती आग रिघे ॥९॥

तैं होय शिव प्रसंन्न । तिला नेयी उद्धरुन । तिणे जे रुद्राक्ष ल्येवून । कुक्कुट मर्कट पाळिले ॥१०॥

इति श्री०प०प०वा०स०वि० रुद्राक्षमहिमावर्णनं नाम त्रयस्त्रिंशो०