गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय बाविसावा

गुरु वसे गाणगापुरीं । तेथें काय लीला करी । असें विप्रें पुसतां बरीं । लीला सारी सांगे सिद्ध ॥१॥

मी तो कः पदार्थ येथ । वर्णावया सर्व चरित । होती ब्रह्मादि कुंठित । तेव्हां संक्षिप्त सांगतों ॥२॥

अमेय कीर्ति गुरु आले । भीमामरजासंगमीं भले । गाणगापुरी राहिले । बैसले अश्वत्थीं तें ॥३॥

हो यद्गत्या गृह पावन । तो विप्रगृहीं येऊन । वांझमहिषी पाहून । ब्राह्मणस्त्रीतें बोले ॥४॥

सु सत्वा तूं दे क्षीरपान । ब्राह्मणी बोले वचन । वांझ म्हैंस हे दुभे न । गुरु दोहून दावीं म्हणे ॥५॥

मानून ती दोही क्षीर । दोन धडे दोहिलें क्षीर । गुरु पिऊनीं देती वर । हो दारिद्र दूर म्हणूनी ॥६॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशो०