गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय अठरावा

सुरेख क्षेत्र गुरु पाहे । कृष्णा पंचगंगा वाहे । तेथें द्वादशाब्द राहे । अजुनी आहे तेथें गुप्त ॥१॥

तेथें दुःखि विप्राघरीं । गुरु शाकभिक्षा करी । घेवडा वेल तोडी करीं । ब्राह्मणी करी दुःख तेव्हां ॥२॥

तद्‌दुःख हरावया । वेलातळीं देई तयां । धनकुंभ गुरुराया । म्हणे तया न प्रगटा हे ॥३॥

इति श्री०प०प०वा०स० सारे धनकुंभप्रदानं नाम अष्टादशो०