गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय आठवा

सिद्ध संक्षेपें सांगत । श्रीपाद तेथूनि येत । कृष्णातीरीं होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥

मूर्ख प्रजासमवेत । लोकनिंदेनें हो त्रस्त । जीव द्याया कृष्णेंत । आकस्मात देखे देव ॥२॥

प्रभू तिला निरोपिती । आत्महत्या दुस्तर म्हणती । जन्मांतरीं सुपुत्राप्ती । व्हाया प्रार्थी मग ती नारी ॥३॥

तन्निष्ठा ओळखून । गुरु सांगती आख्यान । उज्जनींत चंद्रसेन । शिवार्चन करी प्रदोषीं ॥४॥

त्याचा अमूल्य सन्मणी । हराया नृप तत्क्षणीं । घेवोनी अक्षौहिणी । उज्जनी वेढिते ते ॥५॥

हस्त्यश्च रथ पत्ती । पाहोनी न भी चित्तीं । शिवा पूजी तो भूपती । तें देखती गोपपुत्र ॥६॥

अश्वत्थ संनिधानीं । अंगणी ते पाषाणीं । पूजिती, त्यां नेती जननी । पूजनीं रमे एक बाळ ॥७॥

राहे मेळा जातां एकला । पूजा लोटुनि माता त्याला । ओढी तो मूर्छित पडला । शिव त्याला दे सायुज्ज

पुढें नंदस्त्री होऊन । माता लाहे कृष्णनंदन । ज्योतिर्लिंग तें देखून । द्वेष सोडून जाती राजे ॥९॥

पुढें सुत व्हावा तरी । शनिप्रदोष तूं करीं । येरु म्हणे तुम्हासरी । जन्मांतरी पुत्र व्हावा ॥१०॥

जो भाविकां देई वर । तथा म्हणूनी शिरावर । मूर्खपुत्राच्या धरी कर । विद्वद्वर तो जाहला ॥११॥

ती करुनी प्रदोषपूजा । पुढें झाली विप्रात्मजा । स्वसमांन नाहीं दुजा । म्हणूनीं हो तस्तुत दत्त ॥१२॥

इति श्री०प०प०वा०स०वि०स०गु० शनिप्रदोषव्रतकथनं नाम अष्टमो०