संत नामदेवांचे अभंग

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


गंगामाहात्म्य

वाचे ह्मणतां गंगा गंगा । सकळ पापें जाति भंगा ॥१॥
दृष्टी पडतां ब्रह्मगिरि । त्यासि नाहीं यमपुरी ॥२॥
कुशावर्ती करितां स्नान । त्याचें वैकुंठीं राहणें ॥३॥
नामा ह्मणे प्रदक्षिणा । त्यासी जन्म नाहीं पुन्हा ॥४॥